शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जयसिंगपूर पालिका देणार कचºयासाठी घरोघरी कुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:31 IST

जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

ठळक मुद्देगांडूळ खत प्रकल्प उभारणार :३५ लाख रुपयांचा निधी खर्च करणार

संदीप बावचे ।जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या (डस्टबिन) देण्याचे नियोजन केले आहे. गांडूळ खत प्रकल्प राबविण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा केलाजाणार असून, मिळणाºयास्वतंत्र ओल्या कचºयातून खताची निर्मिती केली जाणार आहे. कचराकुंड्यांसाठी निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.कचराकुंड्यांसाठी निविदा

नगरपालिकेकडे घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरामध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प राबवावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा नियमांतर्गत घनकचरा विलगीकरण मोहीम सुरू करावी, असे शासनाचे परिपत्रक पालिकेला आले आहे. त्यामुळे पालिका सभेत चिपरी येथील कचरा डेपोच्या जागेवर गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प राबविण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात दररोज १७ टन कचरा संकलित केला जातो. यामध्ये अंदाजे १० टन ओल्या कचºयाचा समावेश आहे.

खत प्रकल्पासाठी ओल्या कचºयाची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आणि खत प्रकल्पाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिका मोहीम राबविणार आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या दिल्या जाणार आहेत. गेल्या दहा वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. उपनगरांमुळे आरोग्य विभागासमोर कचरा उठाव करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, तुंबलेल्या गटारींच्या स्वच्छतेचे आव्हान पालिकेसमोर आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छतेबाबत पालिकेकडे तक्रारी येतात. शासनाचे उद्दिष्ट आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कचराकुंड्या देण्याबाबत निविदा काढण्यात आली आहे. घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या दृष्टिकोनातून कचराकुंड्या नागरिकांना दिल्या जाणार असून, घंटागाड्याद्वारे शहरातील कचरा संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे.पालिकेची जबाबदारीस्वच्छ महाराष्ट्रांतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार स्वीकारल्यानंतर जयसिंगपूर पालिकेची जबाबदारी वाढली आहे. ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प पालिकेने यापूर्वीच हाती घेतला आहे. मात्र, शहरातील कचºयाच्या प्रश्नाचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. मंगळवारी झालेल्या पालिका सभेत कचरा, मोकाट जनावरे यावरून नगरसेवकांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. 

प्रबोधनाची गरजकचराकुंड्यांबरोबर ओला व सुका कचरा नेमका काय ? याची चित्रासह माहिती असणारी पत्रके वितरित करण्याची गरज आहे. शिवाय ओला कचरा गोळा करणाºया घंटागाड्यांचे नियोजनदेखील महत्त्वाचे आहे. तरच हे अभियान यशस्वी होईल.

स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत पालिकेला मिळालेल्या निधीतून सुमारे ३५ लाख रुपये कचराकुंड्यांसाठी खर्च केले जाणार आहेत. गांडूळ खत प्रकल्पासाठी शहरातून ओला कचरा संकलित केला जाणार आहे.- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी जयसिंगपूर