शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जयसिंगपूर पालिका देणार कचºयासाठी घरोघरी कुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:31 IST

जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

ठळक मुद्देगांडूळ खत प्रकल्प उभारणार :३५ लाख रुपयांचा निधी खर्च करणार

संदीप बावचे ।जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या (डस्टबिन) देण्याचे नियोजन केले आहे. गांडूळ खत प्रकल्प राबविण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा केलाजाणार असून, मिळणाºयास्वतंत्र ओल्या कचºयातून खताची निर्मिती केली जाणार आहे. कचराकुंड्यांसाठी निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.कचराकुंड्यांसाठी निविदा

नगरपालिकेकडे घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरामध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प राबवावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा नियमांतर्गत घनकचरा विलगीकरण मोहीम सुरू करावी, असे शासनाचे परिपत्रक पालिकेला आले आहे. त्यामुळे पालिका सभेत चिपरी येथील कचरा डेपोच्या जागेवर गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प राबविण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात दररोज १७ टन कचरा संकलित केला जातो. यामध्ये अंदाजे १० टन ओल्या कचºयाचा समावेश आहे.

खत प्रकल्पासाठी ओल्या कचºयाची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आणि खत प्रकल्पाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिका मोहीम राबविणार आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या दिल्या जाणार आहेत. गेल्या दहा वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. उपनगरांमुळे आरोग्य विभागासमोर कचरा उठाव करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, तुंबलेल्या गटारींच्या स्वच्छतेचे आव्हान पालिकेसमोर आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छतेबाबत पालिकेकडे तक्रारी येतात. शासनाचे उद्दिष्ट आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कचराकुंड्या देण्याबाबत निविदा काढण्यात आली आहे. घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या दृष्टिकोनातून कचराकुंड्या नागरिकांना दिल्या जाणार असून, घंटागाड्याद्वारे शहरातील कचरा संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे.पालिकेची जबाबदारीस्वच्छ महाराष्ट्रांतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार स्वीकारल्यानंतर जयसिंगपूर पालिकेची जबाबदारी वाढली आहे. ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प पालिकेने यापूर्वीच हाती घेतला आहे. मात्र, शहरातील कचºयाच्या प्रश्नाचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. मंगळवारी झालेल्या पालिका सभेत कचरा, मोकाट जनावरे यावरून नगरसेवकांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. 

प्रबोधनाची गरजकचराकुंड्यांबरोबर ओला व सुका कचरा नेमका काय ? याची चित्रासह माहिती असणारी पत्रके वितरित करण्याची गरज आहे. शिवाय ओला कचरा गोळा करणाºया घंटागाड्यांचे नियोजनदेखील महत्त्वाचे आहे. तरच हे अभियान यशस्वी होईल.

स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत पालिकेला मिळालेल्या निधीतून सुमारे ३५ लाख रुपये कचराकुंड्यांसाठी खर्च केले जाणार आहेत. गांडूळ खत प्रकल्पासाठी शहरातून ओला कचरा संकलित केला जाणार आहे.- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी जयसिंगपूर